प्रजासत्ताक दिन साजरा करण्याचे मुख्य कारण म्हणजे या दिवशी भारतात प्रजासत्ताक आणि राज्यघटना अंमलात आली. याशिवाय या दिवसाचा आणखी एक इतिहास आहे, जो खूपच मनोरंजक आहे. डिसेंबर 1929 मध्ये लाहोरमध्ये पंडित नेहरूंच्या अध्यक्षतेखाली झालेल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनापासून त्याची सुरुवात झाली.