शहरांची संख्या वाढत आहे. शहरात अनेक मजली इमारती, झोपडपट्ट्या, कारखाने व उदयोगधंदयांची गर्दी वाढतच आहे. त्यामुळे शहरांमध्ये वस्ती व उदयोगांमधून बाहेर टाकलेला कचरा, कारखान्यांची धुरांडी, वाहनांची वाढ, सांडपाण्याची अपुरी व्यवस्था यामुळे हवेचे प्रदूषण वाढत आहे. शहरांच्या या हवा-पाणी प्रदूषणाचा दुष्परिणाम होऊन रोगराई वाढते.