सरकारने या सर्व शिफारशी मान्य करून २६ सप्टेंबर १९७५ रोजी क्षेत्रीय ग्रामीण विकास बँक स्थापनेचा वटहुकूम काढला आणि १९७५ नंतर क्षेत्रीय ग्रामीण बँकेचा कायदा करण्यात आला. सुरुवातीला या बँकेचे नियंत्रण केंद्रीय बँकेकडे (रिझर्व्ह बँक) देण्यात आले. त्यानंतर १९८२ मध्ये नाबार्डची स्थापना होऊन ही जबाबदारी नाबार्डकडे देण्यात आली.