सदर कायद्यात या बँकांच्या स्थापनेमागचा हेतू स्पष्टपणे नमूद केला आहे तो असा : ग्रामीण भागात कृषी, व्यापार, वाणिज्य, उद्योग आणि इतर उत्पादक कामांचा विकास करणे, छोटे आणि सीमांत शेतकरी, शेत मजूर, कारागीर आणि छोटे उद्योजक यांना पत पुरवठा आणि इतर बँकिंग सुविधा पुरविणे व तद अनुषंगिक इतर सेवा पुरविणे.