समुद्रात पडणारा सर्व प्लास्टिकचा कचरा समुद्र बाहेरच टाकत असतो. त्यामुळे समुद्रकिनारे तर अस्वच्छ होतातच, त्याशिवाय समुद्री जीवांच्या पैदाशीवरही विपरित परिणाम होतो. प्लास्टिकच्या पिशव्या वगैरे कचरा जलाशयांतील तिवरांच्या झाडांमध्ये अडकून पडतात. त्यामुळे पर्यावरणाचा समतोल राखणारा हा महत्त्वाचा घटकही उद्ध्वस्त होऊ लागतो.