जेव्हा बँकेच्या मालमत्तेपेक्षा अधिक दायित्वे असते आणि गुंतवणूकदार त्यांचे पैसे काढू लागतात तेव्हा बँकेची आर्थिक स्थिती बिकट होते. बँकेकडे जेव्हा रोख रक्कम इतकी कमी होते की ती ग्राहकांप्रती असलेली जबाबदारी पूर्ण करू शकत नाही, तेव्हा बँकेला दिवाळखोर घोषित केले जाते. दिवाळखोरी म्हणजे बँक डबघाईला निघणे.