१९४७ मध्ये बंगालची पुन्हा फाळणी होऊन मुसलमान बहुसंख्य असलेले पूर्वेकडील जिल्हे पूर्व पाकिस्तानात गेले. ब्रिटिश अमदानीत आसाम (१८७४) , बिहार व ओरिसा (१९१२) हे आधीच बंगालपासून अलग झाले होते. भारतातील बंगालच्या भागाला पश्चिम बंगाल हे नाव मिळाले. स्वातंत्र्योत्तर कुचबिहार संस्थान पश्चिम बंगालमध्ये विलीन झाले.