चालुक्य विक्रमादित्याच्या भगिनीने चंपावतीने हे घेतल्यानंतर त्याला चंपावतीनगर असे नाव दिले. प्रसिद्ध गणितज्ञ भास्कराचार्य येथीलच, असा समज आहे. १३२६ मध्ये मुहम्मद बिन तुघलकाने हे यादवांकडून जिंकून चंपावतीनगराऐवजी बीड नाव देऊन सुभ्याची राजधानी केली. त्या अमदानीत जुना खान या सुभेदाराने येथे बऱ्याच सुधारणा केल्या.