ज्ञानी बुद्धांनी उत्तर प्रदेशातील सारनाथ येथे पाच पंडितांना पहिला उपदेश दिला. त्यांच्या पहिल्या उपदेशास 'धम्मचक्रप्रवर्तन' किंवा 'धम्मचक्कपवत्तन' असे म्हणतात. या प्रवचनात बुद्धांनी बौद्ध धम्माची मूलतत्त्वे सांगितली. त्यात त्यांना अनेक शिष्य लाभले आणि बौद्ध धर्म वाढीस लागला.