सध्याच्या शहराच्या मशिदीपासून डच वखारीपर्यंत 'अडत्यांच्या' मोठय़ा पेढी होत्या. त्याठिकाणी मालाची आयात-निर्यात चालायची म्हणून त्या भागाला 'मुंबई बाजार' असे म्हटले जायचे. शिरोडा हे नाव ऐकताच पहिली आठवण होते ती गावातील मिठाची! मिठाचे उत्पादन व विक्री हा मोठा व्यवसाय, मिठाचा सत्याग्रहही याच गावात झाला.