स्वातंत्र्यानंतर हरितक्रांतीमुळे देश अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण बनला. आता शेती धोरणातील प्रासंगिकता नष्ट करून, व्यवहार्य निकषावर दीर्घकालीन धोरण आखले पाहिजे. स्वातंत्र्यप्राप्तीच्या टप्प्यावर भारतीय शेती भरकटलेली, गोंधळलेली, दिशाहीन व धोरणशून्य होती