१५ ऑगस्ट, १९४७ रोजी माझा भारत देश स्वतंत्र झाला आणि आमच्या देशाचा राष्ट्रध्वज म्हणजेच तिरंगा दिल्लीच्या लाल किल्ल्यावर फडकू लागला. त्या वेळेस भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू ह्यांनी ध्वजारोहण केले होते. तेव्हापासून आजपर्यंत राष्ट्राच्या प्रतिष्ठेचे प्रतिक असलेला हा ध्वज फडकत आहे.