1954 पर्यंत केवळ जिवंत व्यक्तींनाच हा पुरस्कार प्रदान केला जात होता. मात्र 1955 मध्ये मरणोत्तर 'भारतरत्न' देण्याची तरतूद करण्यात आली. ज्या व्यक्तींना 'भारतरत्न' प्रदान करण्यात येतो त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा भारताच्या राजपत्राद्वारे केली जाते. दरवर्षी 26 जानेवारीला हा पुरस्कार प्रदान केला जातो.