भारताची राजधानी दिल्ली कधी झाली?
✅ Updated recently
१३ फेब्रुवारी १९३१ रोजी दिल्लीला अविभाजित भारताची राजधानी बनण्याचा मान मिळाला. मात्र त्यासाठी दिल्लीला २० वर्षे वाट पाहावी लागली होती. पाचवे किंग जॉर्ज यांनी १२ डिसेंबर, १९११ ला 'नवी दिल्ली दरबार' या शाही समारंभामध्ये ''आता कलकत्ता ऐवजी दिल्ली ही देशाची राजधानी असेल'', अशी घोषणा केली होती.