भारतात ब्रिटिश अंमलास सुरूवात झाल्यावर १७७३ च्या रेग्युलेटिंग ॲक्ट या नियामक कायद्यानुसार ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या ताब्यातील भारतीय मुलखाच्या शासन प्रमुखास महाराज्यपाल ही संज्ञा रूढ झाली. सुरूवातीस १८३४ पर्यंत बंगालमधील 'फोर्ट विल्यम किल्ल्याचा गव्हर्नर-जनरल' म्हणूनच हे पद सर्वांस ज्ञात होते.