ज्वारी, गहू या पिकांना बाजूला सारुन शेतकऱ्यांनी उन्हाळी सोयाबीन आणि हरभऱ्यावर भर दिला होता तर दुसरीकडे ज्वारीच्या क्षेत्रात घट झाल्याने कडबा या चारा उत्पादनावरही त्याचा परिणाम होणार आहे. त्यामुळे उन्हाळी हंगामात राज्यात मका, कडवळ, बाजरी, नेपिअरग्रास आदी चारा पिकांची लागवड केली आहे.