कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ यानंतर शासन व्यवस्थेचा महत्त्वाचा भाग म्हणजे न्यायव्यवस्था होय. न्यायव्यवस्था कायद्याचा अर्थ स्पष्ट करते. समाजामध्ये नियमाचे कायद्यांचे उल्लंघन करणाऱ्यांना शिक्षा देऊन न्याय देण्यासाठी योग्य कार्य पद्धती असणे गरजेचे आहे.