१७०७ मधे औरंगजेबाच्या मृत्यूनंतर मोगल साम्राज्याचा अस्त होण्यास सुरुवात झाली. १७०७ पासून ते १८५८ या काळात उत्तर मुघल साम्राज्य होते. मुघल साम्राज्याचा शेवटचा बादशाह बहादुरशाह जफर हा होता. १८५८ साली ब्रिटिशांनी दिल्ली ताब्यात घेऊन मोगल साम्राज्य खालसा केले व हिंदुस्थानवर एकछत्री अंमल सुरू केला.