भारतात १८७५ मध्ये मुंबई शेअर बाजार सुरू झाला. १९९० पर्यंत देशात साधारण २३ शेअर बाजार कार्यरत होते. ते प्रामुख्याने क्षेत्रीय स्तरावर कार्यरत होते. या सर्व बाजारातील एकूण व्यवहारांपैकी सुमारे ८० टक्के व्यवहार मुंबई बाजारात होत असत आणि तो देशात सर्वांत मोठा बाजार होता.