भारताची अर्थव्यवस्था ही मिश्र अर्थव्यवस्था आहे. अर्थात, ह्यात भांडवली अर्थव्यवस्था आणि समाजवादी अर्थव्यवस्था दोन्हीमधील कल्पनांचा समावेश केला गेला आहे. पण मागील दशकात, भारताची अर्थव्यवस्था हळूहळू भांडवली अर्थव्यवस्थेकडे झुकत आहे असे दिसते.