गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा साखर कारखान्यांमध्ये ३ कोटी ६ लाख टन अधिक उसाचे गाळप झाले. राज्यातील 199 पैकी 188 कारखाने बंद झाले आहेत तर 10 कारखाने सुरू आहेत. दरम्यान महाराष्ट्र साखर उत्पादनात देशात पहिल्या क्रमांकावर आहे. देशातील 5 कोटी शेतकरी आणि राज्यातील 40 लाख शेतकरी ऊस पीक घेतात.