भारताची लोकसंख्या 1947 मध्ये अंदाजे 36 कोटी होती. 2011च्या जनगणनेनुसार आता देशाची लोकसंख्या 1.21 अब्ज झाली आहे. म्हणजे 64 वर्षात भारताची लोकसंख्या तिपटीहून अधिक झाली आहे. अंदाजे दोन जनगणनेच्या काळात म्हणजे 10 वर्षात प्रत्येक वर्षी लोकसंख्येत 1.50 ते 1.75 कोटी भर पडत आहे.