सरोजिनी नायडू (पूर्वाश्रमीच्या चट्टोपाध्याय) (१३ फेब्रुवारी १८७९—२ मार्च १९४९) या एक राजकीय कार्यकर्त्या आणि कवयित्री होत्या. नागरी हक्क, महिला मुक्ती आणि साम्राज्यवाद विरोधी विचारांच्या समर्थक, वसाहतवादी राजवटीपासून भारताच्या स्वातंत्र्याच्या लढ्यात त्या एक महत्त्वाची व्यक्ती होत्या.