या स्थलांतरांमागचे प्रमुख कारण हे उच्च शिक्षण आणि रोजगार हेच आहे. देशांतरासोबतच देशांतर्गत स्थलांतरेही भारतात सतत आणि मोठ्या प्रमाणात झालेली आहेत. किंबहुना २०००च्या पहिल्या दशकात आपल्या देशात एका राज्यातून दुसऱ्या राज्यात होणाऱ्या स्थलांतरात लक्षणीय वाढ झालेली दिसते.