भारताच्या सर्वोच्च न्यायालयात एक सर न्यायाधीश व इतर 30 न्यायाधीश असतात. ही संख्या ठरविण्याचा अधिकार संसदेला आहे. भारतातील राज्यघटनेनुसार सर्वोच्च न्यायालयाचे प्रत्येक न्यायाधीश वयाची 65 वर्षे पूर्ण होईपर्यंत काम करू शकतात. न्यायाधीशांना पदावरून दूर करणे हे कलम 124 चार मध्ये स्पष्ट केले आहे.