भारत मोठ्या प्रमाणावर आयात करणारा देश आहे. जेव्हा आपण परदेशी लोकांकडून कोणतीही वस्तू खरेदी करतो तेव्हा त्याचे व्यवहार डॉलरमध्ये होतात. अशा परिस्थितीत आयातीला मदत करण्यासाठी परकीय चलनाचा साठा असणं आवश्यक आहे. परदेशातून येणारी गुंतवणूक अचानक कमी झाली, तर त्यावेळी त्याचं महत्त्व आणखी वाढतं.