मान्सूनवर अवलंबून राहणे : भारतातील शेती ही प्रामुख्याने मान्सूनवर अवलंबून असते. मान्सून चांगला असेल तर उत्पादन जास्त होईल आणि पाऊस सरासरीपेक्षा कमी असेल तर पिके करपतील. कधीकधी पुरामुळे आपल्या पिकांचा नाश होतो. सिंचनाच्या सुविधा पुरेशा प्रमाणात नसल्यामुळे शेती मान्सूनवर अवलंबून असते.