पुराच्या वेळी नदीचे पाणी काठांवर लांबपर्यंत पसरते आणि पूर ओसरला म्हणजे गाळ बराचसा खाली बसून तेथे पूरमैदान निर्माण होते. प्रत्येक पुराच्या वेळी काठांवर अधिकच गाळ साचत जातो. मोठ्या खड्यांचा गाळ अगदी काठावर व बारीक गाळ दूरवर पसरला जाऊन काठांवर कित्येकदा पूरतट निर्माण होतात.