अरण्ये, मशागत, गवताळ प्रदेश इत्यादी विविध उद्देशांसाठी जमिनीचा उपयोग करून घेतला जातो. त्याला 'जमिनीचा वापर' असे म्हणतात. जमिनीच्या गुणधर्मानुसार त्याचा वापर निश्चित केला जातो. भूस्वरूप, हवामान, माती, लोकसंख्येची घनता, सामाजिक, आर्थिक व तांत्रिक घटकांवर त्याचा वापर अवलंबून असतो.