महालवारी पद्धत :

* महालवारी पद्धतीत जमिनीवर संयुक्त मालकी गावातील लोकांची असते. सरकार त्या गावाचा शेतसारा म्हणून ठराविक रक्कम ठरवून देत असे.

* ज्याच्याकडे जमिनीची मालकी आहे असे ते सर्व जण व्यक्तीशा किंवा संयुक्तरीत्या शेतसारयाची रक्कम सरकारकडे भरण्यास जबाबदार असते.

* अनेक वेळा एखाद्या प्रतिनिधी मार्फत शेतसारा वसूल करण्याचे आणि तो सरकारकडे जमा करण्याचे काम करत असे.

रयतवारी पद्धत
* १७९२ साली मद्रास प्रांतात रयतवारी पद्धत सुरु झाली. रयतवारी पद्धतीत शेतकरी हाच जमिनीचा मालक असतो. त्यामुळे सरकारकडे शेतसारा जमा करण्याची पद्धत शेतकऱ्यांची असे.

* सरकार व शेतकरी यांच्यात मध्यस्त नसे. प्रत्यक्ष शेतीची मशागत करनारा हा जमिनीचा मालक असल्यामुळे उत्पादन वाढीस प्रेरणा या पद्धतीत होती.

* रयतवारी पद्धतीत शेतकऱ्याची त्याची जमीन दुसऱ्याला करण्यासाठी देण्याचा अधिकार असे.

* शेतजमिनीचा योग्य वापर करण्यासाठी आणि शेतीची उत्पादकता वाढवण्यासाठी जमीन सुधारनाणांची आवश्यकता असते.