महाराष्ट्रात कोण कोणती पिके घेतली जातात?

गहू , ज्वारी, बाजरी, तांदूळ, मका, सोयाबीन, भुईमूग, ऊस जास्त प्रमाणात व मूग, हरबरा, चवळी वटाणा मोहरी , उडीद, कुळीद ही पिके वरील पिकाच्या अंतर्गत घेतली जातात पण त्याचे प्रमाण कमी असले तरी बाजारात विक्रीला त्या मालाला उठाव आहे . पण मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात गहू ज्वारी, बाजरी, भुईमूग सोयाबीन याची शेती केली जाते व डोंगराळ भागात भात लावणी होते .



महाराष्ट्रातील प्रमुख पिके :

महाराष्ट्रातील प्रमुख पिके : महाराष्ट्रातील प्रमुख पिके कोणती आहेत ?असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर त्याच उत्तर आज आपण बगणार आहोत. महाराष्ट्रात प्रामुख्याने कुठली पिके घेतली जातात.त्या पिकासाठी कुठला जिल्हा अग्रेसर आहे. पीक उत्त्पदनाला कशा प्रकारची मृदा लागते.कुठल्या हवामानात हि पिके उत्तम येतात.याची आज आपण सविस्तर माहिती बगणार आहोत.


महाराष्ट्रातील प्रमुख पिके खालीलप्रमाणे आहेत.

प्रमुख पिके उत्पादक जिल्हे मृदा प्रकार हवामान
गहू ,हरभरा
(रब्बी हंगाम ) पुणे ,नगर ,जळगाव ,नाशिक ,
( मध्यम पाऊस ) नागपूर ,परभणी ओलाव्याची सुपीक जमीन थंड हवामान



तांदूळ कोल्हापूर ,सिंधुदुर्ग ,भंडारा ,चंद्रपूर ,गडचिरोली ,रत्नागिरी
(कोकण व वैनगंगेच्या खोरे ) गाळाची सुपीक मृदा जास्त प्रमाणात पाऊस ,उष्ण व दमट हवामान


ज्वारी
(रब्बी व खरीप ) अकोला ,सोलापूर यवतमाळ,पुणे ,अहमदनगर,बीड ,परभणी ,नांदेड काळी,कसदार जमीन उबदार हवमान
( मध्यम पाऊस )


बाजरी ( खरीप हंगाम ) औरंगाबाद ,पुणे ,नगर ,नाशिक ,सोलापूर मध्यम खोल जमीन ,कमी कसदार उबदार हवामान
(मध्यम पाऊस)


मसाल्याचे पदार्थ
(हळद ,मिरची ,लसूण ,
कांदा ) मिरची : अमरावती,सांगली ,नागपूर ,कोल्हापूर
हळद :सातारा, सांगली
कांदा लसूण : निफाड व लांसलगाव (नाशिक ), जुन्नर सुपीक जमीन कोरडे व थंड हवामान 


ऊस ,कापूस ,तंबाखू ऊस : कोल्हापूर ,पुणे ,सांगली ,अहमदनगर
कापूस : धुळे ,जळगाव ,बुलढाणा ,अकोला ,नंदुरबार काळी कसदार जमीन उबदार हवामान ,भरपूर पाणी


तीळ ,तूर ,उडीद ,मूग वर्धा ,नागपूर काळी कसदार जमीन थंड हवामान