महाराष्ट्रात पंचायतराजची स्थापना कधी करण्यात आली?
१ मे १९६२ पासून महाराष्ट्रामध्ये त्रिस्तरीय पंचायत राजची स्थापना कार्नाय्त आली.
ब्रिटिश कालखंडामध्ये सत्तेचे विकेंद्रीकरण होऊन स्थानिक स्वराज्य संस्था जवळपास नष्ट झाल्या. परंतु याच कालखंडामध्ये १६८७ ला देशातील पहिली महानगरपालिका मद्रास येथे स्थापन करून या संस्थांना उजाळा देण्यात आला. १८७० ला लॉर्ड मेयो यांनी आर्थिक विकेंद्रीकरणाच्या ठराव मांडला; त्यामुडेच त्याना आर्थिक विकेंद्रीकरणाचे जनक म्हणतात. १८८२ ला लॉर्ड रिपन यांनी पंचायत राज संबधी कायदा केला. त्यामुळे त्यांना स्थानिक स्वराज संस्थेचे जनक म्हणतात.
भारताला स्वतंत्र मिळाल्यानंतर सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थांना महत्वाचा घटक म्हणून ग्रामपंचायतींना मान्यता देऊन घटनेचे कलम ४०मध्ये ग्रामपंचायतीचा उल्लेख करण्यात आला व त्याच्या माध्यमातूनच महात्मा गांधी यांनी बघितलेले ग्राम स्वराज्याचे स्वप्न पूर्ण करण्याच्या दिशेने वाटचाल सुरु केली. जण सहभागातून लोकांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी अमेरिकेच्या सहकार्याने २ ओक्टोम्बर १९५२ ला सामुदायिक विकास योजना तयार करण्यात आली व या योजनेला अनुसरूनच २ ओक्टोम्बर १९५३ ला राष्ट्रीय विस्तार योजना तयार करण्यात आली. परंतु या योजनेचा लोकांचा अपेक्षित असा पाठिंबा ना मिळाल्यामुळे या दोन्ही योजना अपयशी ठरल्या. नंतर या योजनेचे मूल्यमापन करण्यासाठी केंद्रसरकारच्या पुढाकाराने १९५७ ला बलवंतराय मेहता याच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना करण्यात आली. या समितीने या अहवाल १९५७ ला सादर केला व यामध्ये त्रिस्तरीय पंचायत राजची स्थापना करण्याची शिफारस केली. याचं शिफारशींच्या आधारावर २ ऑक्टोबर १९५९ ला राजस्थान मधील नागोर या ठिकाणी देशातील पहिली ग्राम पंचायत पंडित नेहरू यांच्या हस्ते स्थापन करण्यात आली. त्यामुळे पंचायत राज स्वीकारणारे राजस्थान हे देशातील पहिले राज्य ठरले. आंधरप्रदेश २ रे तर महाराष्ट्र हे ९ वे राज्य आहे. १९९२-९३ साली झालेल्या ७३ व्या घटना दुरुस्तीमुळे पंचायत राज संस्थांना घटनात्मक दर्जा मिळून राज्यघटनेच्या कलम २४३ मध्ये तरतूद करण्यात आली व भारतीय राज्य घटनेला ११ वे परिशिष्ट जोडण्यात आले. या घटना दुरुस्ती मुळे महात्मा गांधी यांनी बघितलेले ग्रामस्वराज्याचे स्वप्न काही अंशी का होईना पूर्ण होताना दिसून येते.
प्राचीन कालखंड
प्राचीन कालखंडाला पंचायत राजचा सुवर्ण कालखंड मानला जातो.
वेद काळामध्ये ग्रामपंचायतीचा उल्लेख समिती या नावाने सापडतो.
वैदिक काळामध्ये गावाच्या प्रमुखास ग्रामिणी या नावाने संबोधले जात होते.
रामायणामध्ये जनपद संघ या शब्दाचा उल्लेख आढळतो.
महाभारतामध्ये ग्रामसभा या शब्दाचा उल्लेख आढळतो.
मनुस्मृती या प्राचीन ग्रंथामध्ये न्यायपंचायतीचा उल्लेख आढळतो.
प्राचीन कालखंडातील मौर्य व चोल या राज घराण्याच्या कालखंडामध्ये पंचायत राजाचा उत्कर्ष झाला.
बुद्धकालीन जातक कथांमध्ये पंचायतीचा उल्लेख आढळतो.
कौटिल्याच्या अर्थशास्त्र या ग्रंथामध्ये ग्राम प्रशासनाचा उल्लेख आढळतो.
मॅगेस्थेनिस ने आपल्या इंडिका या प्रवास वर्णामध्ये नगर प्रशासनाचे वर्णन केले आहे.
प्राचीन कालखंडामध्ये पंचायतीचा प्रमुखास ‘गोपा’ या नावाने संबोधले जाई.
इंडिका हा ग्रंथ चंद्रगुप्त मौर्य यांच्या कालखंडामध्ये मॅगेस्थेनिस यांनी लिहिला.
डी टोकवील यांच्या मते, “स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे लोकशाहीचे पाळणं घर” होय.
उत्तर भारतामध्ये ग्राम प्रशासनाची जबाबदारी पंचकुली या पाच सदस्यावर निर्भर होती.
महाराष्ट्रात पंचायतराजची स्थापना कधी करण्यात आली?
✅ Updated recently