औद्यागिक सांडपाणी प्रक्रिया न करता आहे तसे जमिनीमध्ये सोडले जाते त्यामुळे माती प्रदूषण होते. तसेच शेतीमधील रासायनिक खतांचा अतिवापर व कचरा जाळल्यानेही माती प्रदूषण होते. जंगलतोडीमुळे झाडांची संख्या कमी होते त्यामुळे जमिनीची मोठ्या प्रमाणात धूप होते. हेही माती प्रदूषण होण्याचे कारण आहे.