आपण पर्यावरण संरक्षणाचा विचार करताना केवळ मानवाचा विचार करून चालत नाही. अन्य सजीवांचाही विचार करायला पाहिजे. तसेच अजैविक घटक- जसे भूमी, खनिजे, पाणी, हवा आणि सूर्यप्रकाश यांची पर्यावरण संरक्षणात महत्त्वाची भूमिका आहे हे समजून घेतले पाहिजे. आपण आणि सर्व सजीव हे विविध परिसंस्थांत जगत असतात.