माणसाला इतर प्राण्यांपेक्षा वेगळी ठरविण्या मागे संवाद देखील महत्त्वाची भूमिका बजावतो. संवाद हा सगळ्या समस्या वर एकमेव उपाय ठरतो. समस्या कोणत्याही असो त्याचे निरसन करण्यासाठी आपल्याला संवादाची आवश्यकता भासते. जर दोन व्यक्तींमध्ये भांडण होत असतील आणि त्या भांडणांना सोडवायचे असेल तर आपल्याला सु-संवादाची भाषा बोलावी लागते.