मौर्य साम्राज्य हे जगाच्या इतिहासातील एक महत्वाचे साम्राज्य होते. तसेच ते भारताच्या इतिहासातील सर्वात मोठे साम्राज्य होते. गंगेच्या खोऱ्यातून मगध राज्यापासून उदयास आलेले मौर्य साम्राज्य हे पुढे ५०००००० वर्ग चौरस किमी एवढ्या प्रचंड प्रदेशात वाढले आणि ते त्याकाळातील भारतीय उपखंडातील सर्वात मोठे साम्राज्य ठरले होते.