हैदराबादचा शेवटचा निझाम मीर उस्मान अली खान याने हैदराबाद संस्थान भारतात विलीन होण्यापासून वाचवण्यासाठी कासीम रझवीच्या नेतृत्वाखाली एक क्रूर अर्धसैनिक दल स्थापन केले होते. पद्धतशीर हिंदू विरोधी हिंसाचार हे या दलाचे उद्दीष्ट होते. या दलास त्यावेळेस रझाकार असे संबोधले जात असे.