लोकशाही प्रक्रियेत जनमत तयार करण्याचे काम राजकीय सभा करतात, हे आम्ही नाकारत नाही. १९९२, १९६०च्या सभांनी ते काम मोठ्या प्रमाणावर केलं. पण कायदा धाब्यावर बसवून होणा-या राजकीय सभांमध्ये आता केवळ शक्तिप्रदर्शनच होत असतं, हे खेदानं नमूद करावं लागेल. आज शिवाजी पार्कवर होणाऱ्या मोठ्या सभांसाठी ठिकठिकाणाहून कार्यर्कत्यांना खासगी वाहनांतून आणलं जातं. या गाड्यांच्या रांगा केवळ दादरमध्येच नव्हे तर पार दादर पूर्व, परळ, सायनपर्यंत लागलेल्या दिसतील. यामुळे केवळ पार्कातीलच नव्हे तर या परिसरातील रहिवाशांनाही त्रासाला सामोरे जावे लागते आहे. जाहीरपणे होणाऱ्या राजकीय सभा लोकशाहीसाठी पोषक आहेत. परंतु सध्याच्या राजकीय प्रक्रियेत त्या केवळ 'शक्तिप्रदर्शना'पुरत्या उरल्या आहेत.