राजगड किल्ला हा जुना, दुर्लक्षित, ओसाड पण बळकट गड आहे. हा किल्ला अतिउंच असून मावळातल्या सह्याद्रीच्या अवघड डोंगरावर वसलेला आहे. म्हणून त्याला 'गडांचा राजा' असे म्हणतात. छत्रपती श्री शिवाजी महाराजांनी याच गडावर मोहिमांची आखणी केली.