राजा राम मोहन रॉय यांनी जातिव्यवस्था, अस्पृश्यता, अंधश्रद्धा आणि मादक पदार्थांच्या वापराविरुद्ध प्रचार केला. त्यांनी बालविवाह, बहुपत्नीत्व, स्त्रियांची निरक्षरता आणि विधवांच्या खालावलेल्या अवस्थेवर हल्ला चढवला. त्यांनी त्यावेळच्या हिंदू समाजाच्या कथित कुप्रथांविरुद्ध लढा दिला.