मंत्रालयाच्या प्रशासकीय विभागात नियोजन विभाग महत्त्वाचा मानला जातो. जिल्हा स्तरावर नियोजन मंडळे आहेत. त्यांची शिखर संस्था म्हणून राज्य नियोजन मंडळ ओळखले जाते. नियोजन आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वांच्या आधारे राज्य तसेच जिल्हा पातळीवर पंचवार्षिक तसेच वार्षिक योजना तयार करणे हे मंडळाचे मुख्य काम आहे.