राष्ट्रीय काँग्रेसची कराची अधिवेशन कधी झाले होते?
आयर्विन कराराच्या पार्श्वभूमीवर २६ मार्च ते २९ मार्च १९३१ रोजी कराची येथे काँग्रेसचे अधिवेशन भरले.
त्याच वेळी म्हणजे २३ मार्च १९३१ रोजी ब्रिटिश सरकारने सरदार भगतसिंग , राजगुरू , व सुखदेव या क्रांतीकारकांना फाशी दिली. या क्रांतीकारकाचे प्राण वाचवण्यासाठी गाधीजीनी प्रयत्न केले नाहीत , अशी लोकांची भावना होती. सरदार वल्लभभाई पटेल या अधिवेशनाचे अध्यक्ष होते. अधिवेशनाच्या प्रारंभीच गांधी -आयर्विन कराराला विरोध करण्यात आला. तथापि , अतिशय धीरोदत्तपणे विरोध सहन करून कराराला मान्यता मिळवण्यात गांधीजी यशस्वी झाले. इतकेच नव्हे , तर दुसऱ्या गोलमेज परिषदेला काँग्रेसचे प्रतिनिधी म्हणून गांधीजीनी उपस्थित राहावे असाही निर्णय या अधिवेशनात घेण्यात आला.
कराचीच्या या अधिवेशनाचे आणखी एक वैशिष्ट म्हणजे , ' संपूर्ण स्वातंत्र्य ' हेच काँग्रेसचे ध्येय असल्याचे स्पष्ट करण्यात आले. नागरिकांच्या मुलभूत हक्काविषयी व आर्थिक धोरणाविषयी ठराव करून काँग्रेसने आपली राजकीय व आर्थिक धोरणे प्रथमतः लोकासमोर मांडली. त्यानुसार नागरिकांच्या मुलभूत हक्काचे संरक्षण , धर्मनिरपेक्षता , समाजातील सर्व घटकांना समान संधी , प्रौढ मताधिकारचा स्वीकार, वेठ्बिगारीच्या पद्धतीस विरोध , कामगारांच्या हितसंबंधाचे रक्षण व दुर्बल घटकांच्या शोषणास प्रतिरोध यासारख्या तत्त्वांचा ठरावात प्रथमच समावेश करण्यात आला .
राष्ट्रीय काँग्रेसची कराची अधिवेशन कधी झाले होते?
✅ Updated recently