१९७६ चे धोरण

१९७६मध्ये आणीबाणीच्या काळात राष्ट्रीय लोकसंख्या धोरणाची घोषणा करण्यात आली. या धोरणाने कुटुंब नियोजनाचा कुटुंब कल्याण असा विस्तार केला. त्यानुसार १. सरकारने विधेयक आणून लग्नाचे वय वाढवण्याचे निश्चित केले (मुलींसाठी १८ तर मुलांसाठी २१) २. राज्यांमधील महिला शिक्षणाचा स्तर उंचावण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याचे सरकारने ठरवले. ३. कुंटुब नियोजन करणाऱ्या गरीब कुटुंबांना पैशाच्या स्वरूपात मोबदला देण्याचे ठरले.