रिकार्डोचा हा खंडविषयक सिद्धांत अर्थशास्त्रात महत्त्वाचा सिद्धांत म्हणून गणला जातो. जमिनीच्या दर्जात फरक असल्यामुळे खंड निर्माण होतो. सर्व जमीन सारखीच सुपीक असती, तर खंड निर्माण झाला नसता, असे रिकार्डोचे म्हणणे होते. शेवटी लागवडीखाली आणलेल्या जमिनीचा (सीमांत जमिनीचा) केवळ उत्पादनखर्च भागत असतो.