लेखक-कवी हा त्याच्या विशिष्ट साहित्यपरंपरेमध्ये, तिच्या शैलीमध्ये लेखन करीत असतो. लेखकाच्या असाधारण जाणिवा आणि त्याला भावणारी विशिष्ट, पूर्वनिश्चित शैली यांच्या तणावातून त्याची साहित्यकृती घडत असते... लेखकाच्या जाणिवा शैलीला वाकविण्यात यशस्वी झाल्यास निर्माण होणारी साहित्यकृती ही त्या शैलीचा विकास घडवून आणते.