ग्रामीण विकासकार्यक्रमात सर्वसामान्य लोकांना सत्तेत अधिक वाटा देणे, हा यामागील प्रधान उद्देश होता. यालाच 'लोकशाही विकेंद्रीकरण' असे म्हणतात. विविध राज्यांनी आपापल्या क्षेत्रांत या योजनेची अंमलबजावणी आपल्या गरजा व स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन केली.