ख्रिस्तपूर्व ३२१ ते २६९ ह्या काळात लिहिलेल्या कौटिलीय अर्थशास्त्र नामक भारतीय ग्रंथात तसेच आईन-इ-अकबरी ह्या ग्रंथातही, लोकसंख्याविषयक विवेचन केलेले आहे. परंतु लोकसंख्येच्या शास्त्रशुद्ध अभ्यासाचा पाया घालण्याचे श्रेय मात्र जॉन ग्रॅंट (१६२०−७४) ह्या ब्रिटिश संशोधकाकडे जाते.