वनसंपत्ती कायम टिकावी म्हणून वनांचे संरक्षण करणे आवश्यक आहे. सृष्टीच्या प्रारंभापासूनच मानव आणि निसर्गाचे घनिष्ठ संबंध आहेत. याच वनांनी मानवाच्या अन्न, वस्त्र, निवाऱ्याची सोय केली. फळे त्याचे अन्न, झाडांची पाने म्हणजे त्याचे वस्त्र, झाडांची लाकडे व पाने यापासून बनविलेली झोपडी म्हणजे त्याचे घर होते.