वाऱ्याच्या कार्यामुळे वाळवंटी प्रदेशांत विविध भूरूपे निर्माण होतात. वाऱ्याबरोबर वाहून जाणाऱ्या धुळीचे संचयन वाळवंटातच किंवा वाळवंटाच्या बाहेर दूरपर्यंत होत असते. ज्या ठिकाणावरून वाळू दुसरीकडे वाहून नेली जाते, त्या ठिकाणी काही किलोमीटर लांबीची खोल विवरे व उथळ लहान द्रोणीप्रदेश निर्माण होताना आढळतात.