काल्पनिकता टाळली गेलेल्या लेखनाला वास्तववादी लेखन असे म्हणतात. बहुतांशवेळा असे लेखन स्वतःच्या किंवा इतरांच्या साधार संदर्भासहित स्वानुभावावर अवलंबून असणे अपेक्षित असते. हे लेखन ललितस्वरूपातही असू शकते परंतु यात कथा कादंबरी यातील काल्पनिकता आणि कल्पना रम्यता टाळली जाते.